म्हसवड दि. २५
माण तालुक्यामध्ये सर्वात मोठा अठवडी बाजार हा म्हसवड शहरात भरत असतो याच अठवडी बाजारात सध्या गँस टंचाईमुळे भजी विक्रेत्यांना भजी करण्यासाठी अक्षरशा चुली पेटवाव्या लागल्याचे चित्र आहे.
सध्या सुरु असलेल्या मध्य आखाती देशातील युध्दाची झळ आता ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेला बसु लागली आहे, युध्दाचा परिणाम शेजारील सर्वच देशांवर झाला आहे, आपल्या देशातही इंधनचा तुटवडा जाणवु लागल्याने शासनाने व्यावसायिक गँस सिलेंडर चे वितरण बंद केले आहे. याचा थेट परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाल्याचे दिसुन येते, ग्रामीण भागातील अठवडे बाजार हे तेथील अर्थचक्राचे मुख्य साधन आहे, मात्र याच अठवडी बाजारात छोटे व्यावसाय करणार्या दुकानदारांवर डोळे चोळण्याची वेळ आली आहे, बाजारात भजी करुन त्याची विक्री करणारे अनेक छोटे व्यावसायिक आहेत, या व्यावसायिकांना भजी करण्यासाठी व्यावसायिक गँस सिलेंडर मिळत नसल्याने त्यांनी आपला व्यावसाय वाचवण्यासाठी अठवडी बाजारातच चुली मांडल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. या व्यावसायिकांनी अठवडी बाजारातच भजी करण्यासाठी चुली पेटवल्याने चुलीतुन निघणार्या धरामुळे त्यांच्यावर डोळे चोळण्याची वेळ आली असुन असुन शासनाने यावर त्वरित उपाय योजना करुन छोट्या- छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.०००
