म्हसवड दि. ३१
सकल जैन समाजाचे दैवत असलेल्या भगवान महावीर यांची जयंती म्हसवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व जैन समाजाने एकत्र येत भगवान महावीर यांच्या मुर्तीची पालखीतुन शहरातुन सवाद्य मिरवणुक काढली, यावेळी पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व जैन समाजाने रस्त्यावर रांगोळी काढली होती, तर प्रत्येक समाज बांधवाच्या दारात हा पालखी मिरवणुक सोहळा जात होता, यावेळी जैन समाजाने अंहिसा परमो धर्म चा नारा शहरात दिला, पालखीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी समाजबांधव घराबाहेर थांबले होते, पालखी सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले, तर शहरतील इतर सर्वांना या समाजाने प्रसाद म्हणुन लाडुचे वाटप केले.
यावेळी म्हसवड शहरातील जैन मंदिराची विशेष आरास करण्यात आली होती, तर सकाळी भगवान महावीर यांच्या मुर्तीवर अभिषेक करण्यात आला, तदनंतर शहरातील आनंदीबाई कार्यालय येथे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, यावेळी सर्व जैन समाजाने भगवान महावीर यांच्या नावाचा जय घोष केला. जगाला शांततेचा संदेश देणार्या भगवान महावीर यांच्या विचाराचा वारसा सर्वांनीच अंगिकारावा असे आवाहन यावेळी समाजबांधवानी करीत आजच्या युध्द जन्य परिस्थितीत भगवान महावीर यांच्या शांततेच्या संदेशाची सर्व जगाला आठवण होत असल्याचेही यावेळी समाजबांधवांनी अधोरेखीत केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शशीकिरण देशमाने, संतोष दोशी, डॉ. राजेश शहा, प्रवीण दोशी, जितेंद्र गांधी आदींनी विशेष परिक्रम घेतले.
दरम्यान शहरातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेतही भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुप्षहार घालण्यात आला, यावेळी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.०००
